AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला अंक सुरू झाला आहे. साखळी फेरीतील लढती संपल्या असून सुपर 8 फेरीचा थरार सुरू होणार आहे. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. पण या टप्प्यात कसं गणित असेल तर जाणून घेऊयात.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित
सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 20, 2026 | 6:19 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आठ संघ पोहोचले आहेत. दोन गटात विभागणी झाली असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आहे. प्रत्येक गटातील संघाच्या वाटेला एकूण तीन सामने येणार आहे. हे सामने त्या गटातील संघाशी होणार आहे. जसं की भारताचे सामने झिम्बाव्बे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठायची तर सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी करणं भाग आहे. अन्यथा या स्पर्धेतील आव्हान सुपर 8 फेरीत संपुष्टात येईल. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला तीन सामन्यात काय करावं लागेल? कोणतं समीकरण जुळून आलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल? ते जाणून घ्या.

भारताचं समीकरण कसं असेल?

भारतीय संघाचं एक उदाहरण घेऊयात. इतर संघांनाही ही समीकरण लागून पडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर समोर दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचं आव्हान असणार आहे. या तीन संघांना भारताने पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं तिकीट थेट मिळेल, यात काही शंका नाही. पण तीन पैकी एखाद दुसरा पराभव झाला तर मात्र कठीण होऊ शकते. दोन सामन्यात पराभव झाला तर गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे तसं समीकरण जुळून आलं तर काय?

भारताने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित संघांचे गुण महत्त्वाचे असतील. टॉपला असलेल्या संघाने 3 सामने जिंकले असतील आणि भारताने 2 सामने जिंकले तर उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळेल. यात काही शंका नाही. पण टॉपच्या संघानेही 2 सामने जिंकले असतील तर मात्र गणित गुणांपेक्षा नेट रनरेटच्या आधारावर जुळून येईल. कारण अशा स्थितीत तीन संघांचे गुण समान होतील आणि नेट रनरेटवरच गणित पुढे सरकेल. त्यामुळे भारताला नुसता विजय मिळवून नाही तर नेट रनरेटचं गणितही सांभाळावं लागणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार 21 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. पहिलाच सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेशी, 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी आणि तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी 1 मार्चला होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 फेब्रुवारीला होतील. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे.

Follow Us
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
मोठी बातमी! चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! चिंचवडच्या यात्रेतील व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
Pune -Nashik | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
Pune | स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
.....म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी
मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....