AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला अंक सुरू झाला आहे. साखळी फेरीतील लढती संपल्या असून सुपर 8 फेरीचा थरार सुरू होणार आहे. या फेरीतून चार संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. पण या टप्प्यात कसं गणित असेल तर जाणून घेऊयात.

T20 World Cup 2026 : सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित
सुपर 8 फेरीत किती सामने जिंकले तर उपांत्य फेरीत स्थान मिळेल? जाणून घ्या गणित Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 20, 2026 | 6:19 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आठ संघ पोहोचले आहेत. दोन गटात विभागणी झाली असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आहे. प्रत्येक गटातील संघाच्या वाटेला एकूण तीन सामने येणार आहे. हे सामने त्या गटातील संघाशी होणार आहे. जसं की भारताचे सामने झिम्बाव्बे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठायची तर सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी करणं भाग आहे. अन्यथा या स्पर्धेतील आव्हान सुपर 8 फेरीत संपुष्टात येईल. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला तीन सामन्यात काय करावं लागेल? कोणतं समीकरण जुळून आलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल? ते जाणून घ्या.

भारताचं समीकरण कसं असेल?

भारतीय संघाचं एक उदाहरण घेऊयात. इतर संघांनाही ही समीकरण लागून पडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर समोर दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचं आव्हान असणार आहे. या तीन संघांना भारताने पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं तिकीट थेट मिळेल, यात काही शंका नाही. पण तीन पैकी एखाद दुसरा पराभव झाला तर मात्र कठीण होऊ शकते. दोन सामन्यात पराभव झाला तर गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे तसं समीकरण जुळून आलं तर काय?

भारताने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित संघांचे गुण महत्त्वाचे असतील. टॉपला असलेल्या संघाने 3 सामने जिंकले असतील आणि भारताने 2 सामने जिंकले तर उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळेल. यात काही शंका नाही. पण टॉपच्या संघानेही 2 सामने जिंकले असतील तर मात्र गणित गुणांपेक्षा नेट रनरेटच्या आधारावर जुळून येईल. कारण अशा स्थितीत तीन संघांचे गुण समान होतील आणि नेट रनरेटवरच गणित पुढे सरकेल. त्यामुळे भारताला नुसता विजय मिळवून नाही तर नेट रनरेटचं गणितही सांभाळावं लागणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार 21 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. पहिलाच सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेशी, 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी आणि तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी 1 मार्चला होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 फेब्रुवारीला होतील. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले….

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले…

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल.

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा.

हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा

CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!.

CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!

आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?.

आता इथेनॉलवर शिजणार अन्न, LPG ला रामराम? काय आहे सरकारची योजना ?