AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकाश दीपच्या दोन षटकारामागे असं होतं गणित, विराट-रोहितसह गंभीरही झाला आवाक्

वेगवान गोलंदाज आकाशदीपने पहिल्या डावात दोन गडी बाद करत आपली छाप सोडली. पण इतक्यावर थांबला नाही. जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने चमक दाखवली. दोन षटकार ठोकत कर्णधार रोहित शर्मा, रनमशिन विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्या दोन षटकारामागचं गणित आता कुठे समोर आलं आहे.

आकाश दीपच्या दोन षटकारामागे असं होतं गणित, विराट-रोहितसह गंभीरही झाला आवाक्
Image Credit source: video grab
| Updated on: Sep 30, 2024 | 6:21 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन दिवस पावसामुळे वाया गेले. असं असलं तरी चौथ्या दिवशी सामन्याची रंगत वाढली आहे. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 गडी गमवून 107 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ होईल असंच वाटत होतं. पण चौथ्या दिवशी लंच ब्रेकनंतर लगेचच बांगलादेशचा डाव आटोपला. बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. भारताला जिंकायचं तर या धावांचा पाठलाग करून आघाडी घेणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने भारताने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगला स्टार्ट दिला. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने 233 पार धावा नेण्यास मदत केली. मात्र त्यानंतर डाव गडगडला. भारताने 9 गडी बाद 285 धावांपर्यंत मजल मारली आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 2 गडी बाद 26 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 26 धावांची आघाडी आहे. असं असताना आकाश दीपच्या दोन षटकारांची जोरदार चर्चा रंगली आहे. खेळपट्टीवर पाय ठेवताच आकाश दीपने 3 चेंडूत 2 षटकार मराले. या षटकारांचं विराट कोहलीशी खास कनेक्शन आहे.

विराट कोहलीने नुकतीच एक बॅट आकाश दीपला गिफ्ट दिली होती. त्यामुळे त्याला कानपूर कसोटी खेळण्याची संधी मिळताच तीच बॅट घेऊन उतरला. आकाश दीपने शाकिब अल हसनला दोन षटकार ठोकले. आकाश दीपची फटकेबाजी पाहून विराट कोहली खूश झाला. त्याच्यासोबत इतर दिग्गजही त्याच्या खेळीचा आनंद लुटत होते. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर त्याच्या या शॉट्सचा रिप्ले पाहात होते.

भारताने पाचव्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली तर विजयाच्या आशा आहे. बांगलादेशच्या हातात अजूनही 8 विकेट आहेत. दुसरीकडे, भारताकडे अजूनही 26 धावांची आघाडी आहे. भारताने जर 150 धावांच्या आत बांगलादेशला रोखलं, तर विजय निश्चित होईल. त्यामुळे विजयाच्या सर्व आशा आता गोलंदाजांवर अवलंबून आहेत. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थान आणखी पक्कं होईल.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.