AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध टी 20i सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?

India vs Pakistan T20i : भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक टी 20i धावा करणाऱ्या 5 पैकी 4 फलंदाज हे माजी खेळाडू आहेत. तर सूर्यकुमार यादव हा एकमेव सक्रीय फलंदाज आहे. जाणून घ्या सूर्यकुमार यादव टॉप 5 मध्ये कितव्या स्थानी आहे.

IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध टी 20i सामन्यांत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: @surya_14kumar X Account
| Updated on: Sep 21, 2025 | 7:24 PM
Share

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची कायमच क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते. टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने दोन्ही शेजारी संघ हे दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारताने साखळी फेरीत पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा 21 सप्टेंबरला पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर पाकिस्तान 14 सप्टेंबरच्या पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने पाकिस्तान विरूद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

रनमशीन विराट कोहली

विराट कोहली याने भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने भारताचं 2012 ते 2024 दरम्यान प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध 11 सामन्यांमध्ये 70.28 च्या सरासरीने आणि 123.92 स्ट्राईक रेटने 492 केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत.

सिक्सर किंग युवराज सिंह

विराटनंतर भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध भारताचा माजी स्टार ऑलराउंडर युवराज सिंह याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. युवीने 8 टी 20i सामन्यांमध्ये 155 धावा केल्या आहेत. युवीने या 155 धावांदरम्यान 1 अर्धशतक ठोकलं आहे.

गौतम गंभीर

विद्यमान प्रमुख प्रशिक्षक आणि माजी ओपनर गौतम गंभीर भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध 5 टी 20 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या आहेत. गंभीरची पाकिस्तान विरुद्धची 75 ही सर्वोच्च धावसंख्या होती.

रोहित शर्मा

रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्ध भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय आहे. रोहितने 12 सामन्यांमध्ये 127 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 2 अर्धशतकं झळकावली आहेत.

सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानी

टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान विरुद्ध 111 धावा केल्या आहेत. सूर्याने एकूण 6 सामन्यांमध्ये या धावा केल्या आहेत. सूर्याची 47 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. सूर्याने 22.20 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. सूर्याने या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. सूर्याने पाकिस्तान विरुद्ध आणखी 45 धावा केल्यास तो भारतासाठी शेजारी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरेल. सूर्या यासह गंभीर, युवराज आणि रोहित या तिघांना मागे टाकेल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.