AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Sharma ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच बॉलवर ढेर, कॅप्टन श्रेयसकडूनही निराशा

India A vs Australia A 2nd Odi : भारतीय चाहत्यांना ज्या दोघांकडून वादळी आणि स्फोटक खेळीची अपेक्षा होती त्यांनीच निराशा केली. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना दुसऱ्या सामन्यात काही खास करता आलं नाही.

Abhishek Sharma ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच बॉलवर ढेर, कॅप्टन श्रेयसकडूनही निराशा
Abhishek Sharma and Shreyas IyerImage Credit source: PTI
| Updated on: Oct 03, 2025 | 4:51 PM
Share

इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या अनऑफीशियल वनडे सीरिजची धमाक्यात सुरुवात केली. भारताने 1 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात कांगारुंचा 171 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यर या जोडीने पहिल्या सामन्यात धमाकेदार शतक ठोकलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतीय चाहत्यांना श्रेयसकडून अशाच तडाखेदार खेळीची आशा होती. तसेच आशिया कप 2025 फायनलनंतर सीनिअर टीममधील अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा हे खेळाडू ए संघासह जोडले गेले. त्यामुळे कांगारु विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात बिग शो पाहायला मिळेल, असा अंदाज चाहत्यांचा होता. मात्र अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चाहत्यांची निराशा केली.

अभिषेक शर्मा-श्रेयस अय्यर ढेर

अभिषेक शर्मा याने टी 20i आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम केला. त्यामुळे अभिषेक त्याच तडाख्याने कांगारुंविरुद्ध खेळेल, असं प्रत्येक भारतीय चाहत्याला अपेक्षित होतं. मात्र अभिषेक कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममधील आयोजित दुसऱ्या सामन्यात गोल्डन डक ठरला. अर्थात अभिषेक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. तर श्रेयस अय्यर याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

निराशाजनक सुरुवात

टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला. अभिषेक डावातील पहिल्याच बॉलवर कॅच आऊट झाला. जॅक एडवर्ड्सने अभिषेकला आऊट केलं.

अभिषेकने आशिया कप 2025 स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या होत्या. अभिषेकला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

अभिषेकनंतर भारताने 6 धावेवर दुसरी विकेट गमावली. प्रभसिमरन सिंग 1 रनवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन श्रेयस 13 बॉलमध्ये 8 रन्स करुन माघारी परतला. जॅक एडवर्ड्सने श्रेयसला बोल्ड केलं. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 17 अशी नाजूक स्थिती झाली.

भारताची विजयी सलामी

श्रेयस अय्यर याने पहिल्या सामन्यात 110 धावांची खेळी केली होती. तसेच प्रभसिमरनने 56 धावांचं योगदान दिलं होतं. भारताने या जोरावर 413 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना 33.1 ओव्हरमध्ये 242 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह पहिला सामना 171 धावांनी जिंकला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.