AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Final: भारतच जिंकणार आशिया कप! 28 तारीख आणि पाकिस्तानचा 36 चा आकडा

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे.

IND vs PAK Final: भारतच जिंकणार आशिया कप! 28 तारीख आणि पाकिस्तानचा 36 चा आकडा
IND vs PAK Final: भारतच जिंकणार आशिया कप! 28 तारीख आणि पाकिस्तानचा 36 आकडाImage Credit source: ACC
| Updated on: Sep 27, 2025 | 6:15 PM
Share

आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या स्पर्धेत तिसऱ्यांदा दोन्ही संघांचा सामना होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत होईल. गेल्या 16 पर्वात कट्टर प्रतिस्पर्धी कधीही अंतिम फेरीत एकमेकांशी खेळलेले नाहीत. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागून आहे. 28 सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात हे दोन संघ भिडणार आहे. भारतीय संघ नवव्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यास सज्ज आहे. दुसरीकडे, 28 तारखेचा आकडा पाहून पाकिस्तानला घाम फुटला आहे. कारण यापूर्वी 28 तारखेला खेळलेल्या दोन सामन्यात भारताने पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची धाकधूक आतापासूनच वाढली आहे.

दोन्ही संघ यापूर्वी 28 डिसेंबर 2012 रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा दोन्ही संघ टी20 सामा खेळले होते. तेव्हा भारताने या सामन्यात पाकिस्तानला 11 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंक आशिया कपच्या 2022 मध्ये टी20 सामन्यात 28 ऑगस्टला आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानवर 4 गडी राखून विजय मिळवला होता. दोन्ही विजयामुळे भारतीय फॅन्सच्या मते ही तारीख शुभ मानली जात आहे. आता 28 सप्टेंबर 2025 ला अंतिम सामना होणार आहे. आता या शुभ तारखेची जादू कायम राहते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, आशिया कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीवर ग्रहांचा प्रभाव पडणार आहे. हा सामना अतितटीचा होईल असं ज्योतिष सांगत आहेत. पण टीम इंडियावर ग्रहांचा अनुकूल परिणाम होताना दिसत आहे. भारत शेवटी जिंकेल अशी अपेक्षा आहे. कारण गुरु आणि मंगळाची स्थिती भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारताने आशिया कप स्पर्धेत नऊ वेळा जेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 20210, 2016, 2018, 2023 साली जेतेपद जिंकलं. तर पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने 2000 आणि 2012 साली विजय मिळवला आहे. त्यामुळे या स्पर्धेतही भारताचं पारडं जड आहे. इतकंच काय भारताने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीतही पराभवाची धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.