AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs KKR: चेन्नई कोलकाता यांच्यात स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई, कोण ठरणार वरचढ?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 22वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेतील कामगिरी काही विशेष नाही. पण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. चला जाणून घेऊयात पुढच्या प्रवासाबाबत...

IPL 2026, CSK vs KKR: चेन्नई कोलकाता यांच्यात स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई, कोण ठरणार वरचढ?
IPL 2026, CSK vs KKR: चेन्नई कोलकाता यांच्यात स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई, कोण ठरणार वरचढ?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2026 | 4:03 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 22वा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण या दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकात्याने चार सामने खेळले, त्यापैकी तीन सामने गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे या दोन्ही संघांचा स्पर्धेतील पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. तर कोलकाता अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा स्थितीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे.

आयपीएलच्या इतिहासातील हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यांनी मिळून आठ ट्रॉफी जिंकल्या आहेत. पाच जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने, तर तीन जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही संघात 32 सामने झाले आहेत. या 32 सामन्यांपैकी चेन्नई सुपर किंग्सने 20 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सने 11 वेळा विजय मिळवला आहे. यात एक सामना अनिर्णित राहिला. 2025 या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. तर चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्या सामन्यात 2 गडी राखून विजय मिळवला.

पिच रिपोर्ट

चेन्नई आणि कोलकाता हे संघ चेपॉक मैदानावर भिडणार आहेत. चेन्नईचं हे होमग्राउंड असून फलंदाजीला पूरक मानलं जातं. लाल मातीची खेळपट्टी असून सातत्यपूर्ण मोठ्या धावसंख्येसाठी अनुकूल मानली जाते. यावर्षी चेन्नईमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत.दुसऱ्या सत्रात दव पडणे हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. हा सामना 14 एप्रिल रोजी, संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता होईल.

Follow Us
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...