AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूच

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात मुंबईचा पहिला सामना हैदराबादशी होत आहे. मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पहिल्या दिवशी 4 गडी गमवून 332 धावा केल्या.

Ranji Trophy : मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूच
मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूचImage Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 8:06 PM
Share

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून अखिल हरवडकर आणि आकाश आनंद यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. अखिल हरवडकर 27 धावा करून बाद झाला आणि मुशीर खान मैदानात आला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत 6 धावांची भर पडली आणि आकाश आनंद 35 धावांवर तंबूत गेला. दोन विकेट 66 धावांवर पडल्यानंतर कर्णधार सिद्धेश लाड मैदानात उतरला. मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांची भागीदारी फार काही टिकली नाही. 16 धावा दोघांनी मिळून केल्या आणि मुशीर खान बाद झाला. मुशीर खानचा डाव फक्त 11 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला.

कर्णधार सिद्धेश लाड आणि सरफराज खान यांनी चौथ्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबईने 300 च्या पार धावसंख्या नेली. सिद्धेश लाडने 179 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 104 धावा केल्या. पण रोहित रायुडूच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. सरफराज खान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 164 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 142 धावांवर खेळत आहे. तर हिंमाशू सिंगने चेंडूंचा सामना केला आणि त्याला एकही धाव करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 4 गडी गमवून 332 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी यात आणखी धावांची भर पडणार यात काही शंका नाही. हैदराबादकडून रोहित रायुडूने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि नितीन साई यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एलिट डी गटात मुंबई अव्वल स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे खात्यात 24 गुण असून नेट रनरेट हा +1.527 आहे. तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत पाचपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. हैदराबादचे 13 गुण असून नेट रनरेट हा +0.926 आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...