AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूच

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात मुंबईचा पहिला सामना हैदराबादशी होत आहे. मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि पहिल्या दिवशी 4 गडी गमवून 332 धावा केल्या.

Ranji Trophy : मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूच
मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला, सरफराजची द्विशतकाकडे कूचImage Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 8:06 PM
Share

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून अखिल हरवडकर आणि आकाश आनंद यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. अखिल हरवडकर 27 धावा करून बाद झाला आणि मुशीर खान मैदानात आला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत 6 धावांची भर पडली आणि आकाश आनंद 35 धावांवर तंबूत गेला. दोन विकेट 66 धावांवर पडल्यानंतर कर्णधार सिद्धेश लाड मैदानात उतरला. मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांची भागीदारी फार काही टिकली नाही. 16 धावा दोघांनी मिळून केल्या आणि मुशीर खान बाद झाला. मुशीर खानचा डाव फक्त 11 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला.

कर्णधार सिद्धेश लाड आणि सरफराज खान यांनी चौथ्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबईने 300 च्या पार धावसंख्या नेली. सिद्धेश लाडने 179 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 104 धावा केल्या. पण रोहित रायुडूच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. सरफराज खान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 164 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 142 धावांवर खेळत आहे. तर हिंमाशू सिंगने चेंडूंचा सामना केला आणि त्याला एकही धाव करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 4 गडी गमवून 332 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी यात आणखी धावांची भर पडणार यात काही शंका नाही. हैदराबादकडून रोहित रायुडूने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि नितीन साई यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

एलिट डी गटात मुंबई अव्वल स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे खात्यात 24 गुण असून नेट रनरेट हा +1.527 आहे. तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत पाचपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. हैदराबादचे 13 गुण असून नेट रनरेट हा +0.926 आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.