AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा निर्णय! शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा, श्रेयस अय्यरला डावललं कारण…

शार्दुल ठाकुरला भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण झालं आहे. असं असताना त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान या सारखे खेळाडू खेळणार आहेत.

मोठा निर्णय! शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा, श्रेयस अय्यरला डावललं कारण...
मोठा निर्णय! शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा, श्रेयस अय्यरला डावललं कारण...Image Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2025 | 4:46 PM
Share

भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणाऱ्या शार्दुल ठाकुर याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे. झोनल निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. हा निर्णयानंतर क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. श्रेयस अय्यर संघात असताना शार्दुल ठाकुर का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण असा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आशिया कप स्पर्धा… ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि श्रेयस अय्यरची भारतीय संघात वर्णी लागू शकते. त्यामुळे त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकुरकडे नेतृत्व सोपवलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी खेळण्यास उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. श्रेयस अय्यर भारतासाठी 14 कसोटी खेळला आहे. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

दुसरीकडे, या संघातून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डावलण्यात आलं आहे. दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळताना दिसत नाही. चेतेश्वर पुजार 2023 ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातविरुद्ध फेब्रुवारी 2025 मध्ये शेवटचा सामना, तर लिस्ट ए मध्ये सिक्किमविरुद्ध 5 डिसेंबर 2023 रोडी शेवटचा सामना खेळला होता. तर अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये शेवटचा सामना, तर मुंबईकडून विदर्भविरुद्ध 2025 शेवटचा सामना खेळला होता.

दरम्यान, शार्दुल ठाकुरच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वेस्ट झोन संघ तुलनेने अधिक मजबूत वाटत आहे. शार्दुल ठाकुरने मागच्या पर्वात मुंबईला रणजी स्पर्धेत यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघ : शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड़, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्र जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.