AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुबमन गिलने प्रशिक्षकाचं काही ऐकलं नाही, शेवटी नको तो दिवस पाहण्याची आली वेळ Video

पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाचा खंड वारंवार पडत आहे. तसेच भारताच्या विकेटही पडत आहे. कर्णधार शुबमन गिलची विकेट पाहून तर क्रीडाप्रेमींचा संताप झाला आहे. त्यामुळे संघ अडचणीत आला आहे.

शुबमन गिलने प्रशिक्षकाचं काही ऐकलं नाही, शेवटी नको तो दिवस पाहण्याची आली वेळ Video
शुबमन गिलने प्रशिक्षकाचं काही ऐकलं नाही, शेवटी नको तो दिवस पाहण्याची आली वेळ Video Image Credit source: PTI
| Updated on: Jul 31, 2025 | 10:34 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी सुरुवातीला दिसत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सावध फलंदाजी करणं गरजेचं होतं. त्यात पावसामुळे खंड पडत असल्याने गोलंदाजांना मदत होत आहे. पहिल्या सत्रात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल बाद होत तंबूत परतले. कर्णधार शुबमन गिल दोन विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला. साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिलकडून अपेक्षा होती. दोघं तग धरून खेळत होते. दुसऱ्या सत्रापर्यंत त्यांनी गोलंदाजांचा चांगला सामना केला. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. शुबमन गिल स्वत:च्या चुकीमुळे फुकटची विकेट देऊन आला. खरं तर अशा पद्धतीने कसोटीत बाद होणे गुन्हा आहे. मात्र शुबमन गिलने प्रशिक्षकाच्या सूचनेकडे कानाडोळा केला आणि स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली. तसेच संघाला अडचणीत आणले.

पावसाच्या व्यत्ययानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर सामना सुरु झाला तेव्हा भारतीय संघ चांगल्या स्थितीत होता. पण शुबमन गिल नको ती चूक करून बसला. खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये अशी चूक करणं अक्षम्य गुन्हा मानला जातो. वेगवान गोलंदाज गस एटकिंसनच्या गोलंदाजीवर कर्णधार गिलने फ्रंटफूटवर डिफेंड केला. हा चेंडू शॉर्ट कव्हरला गेला. गिलने वेगाने धाव घेऊ इच्छित होता. पण साई सुदर्शन यासाठी तयार नव्हता. एटकिंसन वेगाने चेंडूवर धावत गेला आणि चेंडू स्ट्राईकला असलेल्या स्टंपच्या दिशेने फेकला. गिल पुन्हा क्रिजमध्ये येण्याआधीच स्टंप उडाल्या होत्या. गिल 21 धावा करून बाद झाला आणि साई सुदर्शनसोबतची 45 धावांची भागीदारी मोडली.

शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांना आधीच धाव घेण्याबाबत इशारा मिळाला होता. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने या दोघांना कानपिचक्या दिल्या होत्या. मँचेस्टर कसोटीत समालोचन करणाऱ्या आशिष नेहरा याने आयपीएलमध्येही असेच बाद झाल्याचं सांगितलं. त्यावेळेस मी त्यांना अशा पद्धतीने आत्महत्या करू नका असा सल्ला देत असे. पण यावेळी शुबमन गिला हा सल्ला विसरला आणि टीम इंडियाला अडचणीत आणले.

Follow Us
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल