AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND VS AUS: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रकImage Credit source: PTI
| Updated on: Jan 16, 2026 | 6:20 PM
Share

India vs Australia Womens Cricket Series: वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतंच श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 5-0 ने जिंकली. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा  सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत असून ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर जात आहे. असं असताना भारतीय महिला संघाच्या वनडे आणि टी20 मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतासाठी कसोटी असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ प्रथम टी20 मालिका खेळणार आहे. पहिला टी20 सामना सिडनीत 15 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा टी20 सामना होबार्टमध्ये 19 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तर तिसरा टी20 सामना एडिलेड ओव्हलमध्ये 21 फेब्रुवारीला होणार आहे.

वनडे मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना होबार्टमध्ये 27 फेब्रुवारीला, तर तिसरा वनडे सामना 1 मार्चला होबार्टमध्येच होईल. भारतीय संघासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण वनडे असो की टी20 दोन्ही फॉर्मेटमध्ये भारताची आकडेवारी काही खास नाही. वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने 19 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय महिला ऑस्ट्रेलियात एकही वनडे सामना जिंकू शकली नाही.

टी20 मालिकेतही भारताची स्थिती फार वाईट आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 12 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असलं तरी भारताने एक टी20 मालिका जिंकली आहे. पण हा विजय देखील 10 वर्षाआधी म्हणजेच 2016 मध्ये मिळाला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतून भारतीय संघाची लिटमस टेस्ट होणार आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.