AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND VS AUS: वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

India vs Australia: भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार सहा सामने, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रकImage Credit source: PTI
| Updated on: Jan 16, 2026 | 6:20 PM
Share

India vs Australia Womens Cricket Series: वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतंच श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 5-0 ने जिंकली. आता वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा  सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत असून ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर जात आहे. असं असताना भारतीय महिला संघाच्या वनडे आणि टी20 मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका भारतासाठी कसोटी असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ प्रथम टी20 मालिका खेळणार आहे. पहिला टी20 सामना सिडनीत 15 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरा टी20 सामना होबार्टमध्ये 19 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तर तिसरा टी20 सामना एडिलेड ओव्हलमध्ये 21 फेब्रुवारीला होणार आहे.

वनडे मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना होबार्टमध्ये 27 फेब्रुवारीला, तर तिसरा वनडे सामना 1 मार्चला होबार्टमध्येच होईल. भारतीय संघासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण वनडे असो की टी20 दोन्ही फॉर्मेटमध्ये भारताची आकडेवारी काही खास नाही. वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने 19 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारतीय महिला ऑस्ट्रेलियात एकही वनडे सामना जिंकू शकली नाही.

टी20 मालिकेतही भारताची स्थिती फार वाईट आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 12 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असलं तरी भारताने एक टी20 मालिका जिंकली आहे. पण हा विजय देखील 10 वर्षाआधी म्हणजेच 2016 मध्ये मिळाला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतून भारतीय संघाची लिटमस टेस्ट होणार आहे.

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.