AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2027: टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, 20 जणांची नावं फिक्स! रोहित-विराटसह कोण कोण?

Icc T20i World Cup 2027 : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. मात्र आता टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना वर्ल्ड कपसह विजयी निरोप देण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.

ODI World Cup 2027: टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, 20 जणांची नावं फिक्स! रोहित-विराटसह कोण कोण?
Virat Rohit and Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 20, 2026 | 11:19 PM
Share

टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात कामगिरीचा आलेख हा चढता राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका, मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि पुन्हा टी 20i वर्ल्ड कप 2026 अशा एकूण आणि सलग 3 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. आता 2027 साली वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचं 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. मात्र आता गतउपविजेता टीम इंडिया वर्ल्ड कप उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यानुसार टीम मॅनेजमेंटने हालचालींना सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी टीम मॅनेजमेंटने 20 खेळाडू निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.

टीम इंडियातील खेळाडू आयपीएलच्या 19 व्या मोसमामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून 2 महिने दूर असणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध भिडणार आहे. खेळाडूंचा या मालिकेत चमकदार कामगिरी करुन वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला दावा निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम मॅनेजमेंटने या स्पर्धेसाठी 20 खेळाडू निश्चित केले आहेत. या 20 मधील खेळाडूंचीच कामगिरीच्या आधारावर निवड केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

20 खेळाडूंमध्ये कोण कोण?

आयसीसी स्पर्धेसाठी तसेच कोणत्याही मालिकेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचीच निवड केली जाते. तर इतर खेळाडूंना सोयीनुसार राखीव म्हणून संधी दिले जाते. आता आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी 20 पैकी 15 खेळाडूंची निवड होणार आहे. या 15 खेळाडूंमध्ये कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचं नाव निश्चित आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकुट असणार हे देखील निश्चित आहे.

तसेच केएल राहुल, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव यांचाही समावेश 20 खेळाडूंमध्ये जवळपास असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांचं नाव निश्चित आहे.

बॅकअप ओपनर म्हणून कोण?

बॅकअप ओपनर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि अभिषेक शर्मा यांचा समावेश केला जाऊ शकतो. फिरकी गोलंदाजीसाठी अनुभवी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांचं नावं निश्चित समजलं जात आहेत.

विकेटकीपिंगसाठी चुरस

विकेटकीपर म्हणून कुणाला संधी द्यायची? यासाठी टीम मॅनेजमेंटला फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. इशान किशन आणि संजू सॅमसन दोघेही फॉर्ममध्ये आहेत. तसेच ऋषभ पंत हा देखील या शर्यतीत आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुणाचा समावेश केला जाणार हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होणार आहे.

आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाचे संभाव्य 20 खेळाडू : शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ईशान किशन, अभिषेक शर्मा, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा