AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट अ कॅच..! विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिली अशी रिअ‍ॅक्शन Video Viral

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. त्यात आघाडी तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीचा ग्लेन फिलिप्सने जबरदस्त झेल पकडला.

व्हॉट अ कॅच..! विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिली अशी रिअ‍ॅक्शन Video Viral
| Updated on: Mar 02, 2025 | 4:01 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील औपचारिक सामना सुरु आहे. पण या सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीच्या लढती ठरणार आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा याची नाणेफेक गमवण्याची मालिका सुरुच आहे. आताही नाणेफेक गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. असं असताना भारतीय संघाला सुरुवातीला तीन धक्के बसले. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीही या सामन्यात काही खास करू शकला नाही. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात कमनशिबी ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ग्लेन फिलिप्सने त्याचा जबरदस्त झेल पकडला. शुबमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. त्याने दोन चौकार मारून क्रीडाप्रेमींना दिलासा दिला होता. पण एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विराट कोहलीने जोरात बॅकवर्ड प्वॉइंटच्या दिशेने ग्लेन फिलिप्सच्या बाजूने फटका मारला होता. त्यामुळे हा चेंडू सहज बाजूने निघेल असं वाटत होतं. 0.62 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. पापणी लवते न लवते तोच ग्लेन फिलिप्सने अप्रतिम झेल पकडला.

विराट कोहली अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने डोक्यावर हात मारला. अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिलाही अशा पद्धतीने बाद होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तिला आश्चर्यकारक हसू आलं. खरं तर तिला अशा पद्धतीने बाद होऊ शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात 14 चेंडू खेळत 11 धावा करून बाद झाला.

टीम इंडियाच्या 30 धावा असताना 3 विकेट पडल्या. त्यामुळे टीम इंडिया संकटात पडली होती. मात्र त्यानंतर मधल्या फळीत अक्षर पटेल आणि श्रेयस यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 40 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसं पाहिलं तर या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणावर काहीच परिणाम होणार आहे. पण टीम इंडियाने हा सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाशी लढत करावी लागणार आहे.

Follow Us
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.