AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट अ कॅच..! विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिली अशी रिअ‍ॅक्शन Video Viral

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. त्यात आघाडी तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीचा ग्लेन फिलिप्सने जबरदस्त झेल पकडला.

व्हॉट अ कॅच..! विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिली अशी रिअ‍ॅक्शन Video Viral
| Updated on: Mar 02, 2025 | 4:01 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील औपचारिक सामना सुरु आहे. पण या सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीच्या लढती ठरणार आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा याची नाणेफेक गमवण्याची मालिका सुरुच आहे. आताही नाणेफेक गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. असं असताना भारतीय संघाला सुरुवातीला तीन धक्के बसले. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीही या सामन्यात काही खास करू शकला नाही. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात कमनशिबी ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ग्लेन फिलिप्सने त्याचा जबरदस्त झेल पकडला. शुबमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. त्याने दोन चौकार मारून क्रीडाप्रेमींना दिलासा दिला होता. पण एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विराट कोहलीने जोरात बॅकवर्ड प्वॉइंटच्या दिशेने ग्लेन फिलिप्सच्या बाजूने फटका मारला होता. त्यामुळे हा चेंडू सहज बाजूने निघेल असं वाटत होतं. 0.62 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. पापणी लवते न लवते तोच ग्लेन फिलिप्सने अप्रतिम झेल पकडला.

विराट कोहली अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने डोक्यावर हात मारला. अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिलाही अशा पद्धतीने बाद होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तिला आश्चर्यकारक हसू आलं. खरं तर तिला अशा पद्धतीने बाद होऊ शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात 14 चेंडू खेळत 11 धावा करून बाद झाला.

टीम इंडियाच्या 30 धावा असताना 3 विकेट पडल्या. त्यामुळे टीम इंडिया संकटात पडली होती. मात्र त्यानंतर मधल्या फळीत अक्षर पटेल आणि श्रेयस यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 40 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसं पाहिलं तर या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणावर काहीच परिणाम होणार आहे. पण टीम इंडियाने हा सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाशी लढत करावी लागणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत