AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे बीसीसीआय आता पुढच्या तयारीला लागली आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. अशा स्थितीत कर्णधारपदी सूर्यकुमार असेल की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!
सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!Image Credit source: BCCI
| Updated on: May 23, 2026 | 8:35 PM
Share

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदाला गवसणी घातली. पण त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. अशा स्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. कारण आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या एका गटाला टी20 संघात बदल हवे आहेत. गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आणि आयपीएलमध्येही त्याला लय परत मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याचं कर्णधारपद जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. पण त्याची कर्णधारपदावरून गच्छंती करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंबीर सूर्यकुमार यादवच्या पाठिमागे ठामपणे उभा असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12 डावात सूर्यकुमार यादवने फक्त 210 धावा केल्या. खरं तर सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा होत्या. पण झालं नाही. उलट एकाच ठिकाणी तशाच पद्धतीचा फटका मारून बाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्याची कमकुवत बाजू अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संघ व्यवस्थापन भविष्यातील योजगांना गंभीरपणे विचार करत आहे. दुसरीकडे, संघाच्या वातावरणासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील चांगले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गौतम गंभीरचं म्हणणं टाळता येणार नाही. आता गौतम गंभीरचं म्हणणं काय आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. याचा सरळ अर्थ असा की सूर्यकुमारच्या भविष्याचा अंतिम निर्णय गंभीरचाच असेल.

कर्णधारपदी कोणाचा दावा?

सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सोडले किंवा त्याला या पदावरून पायउतार व्हावं लागलं तर टीम इंडियाकडे काय पर्याय असतील. तसं पाहिलं तर टी20 संघासाठी बरेच पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे शुबमन गिल असणार आहे. कारण तिन्ही संघांसाठी एकच कर्णधार ठेवता येईल. आता वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने संयमी आणि गरजेवेळी आक्रमक खेळी केली आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर या शर्यतीत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत त्याचे नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत. या दोघांमध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे तिलक वर्माचं आहे. पण त्याच्याकडे काहीच अनुभव नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नावाचा विचार केला जाईल.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल