AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे बीसीसीआय आता पुढच्या तयारीला लागली आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. अशा स्थितीत कर्णधारपदी सूर्यकुमार असेल की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!
सूर्यकुमार यादव कर्णधारपदी राहणार की जाणार? बीसीसीआय नाही तर या व्यक्तीच्या हाती निर्णय!Image Credit source: BCCI
| Updated on: May 23, 2026 | 8:35 PM
Share

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदाला गवसणी घातली. पण त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. अशा स्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. कारण आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या एका गटाला टी20 संघात बदल हवे आहेत. गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आणि आयपीएलमध्येही त्याला लय परत मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याचं कर्णधारपद जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. पण त्याची कर्णधारपदावरून गच्छंती करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंबीर सूर्यकुमार यादवच्या पाठिमागे ठामपणे उभा असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 12 डावात सूर्यकुमार यादवने फक्त 210 धावा केल्या. खरं तर सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा होत्या. पण झालं नाही. उलट एकाच ठिकाणी तशाच पद्धतीचा फटका मारून बाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्याची कमकुवत बाजू अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संघ व्यवस्थापन भविष्यातील योजगांना गंभीरपणे विचार करत आहे. दुसरीकडे, संघाच्या वातावरणासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील चांगले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गौतम गंभीरचं म्हणणं टाळता येणार नाही. आता गौतम गंभीरचं म्हणणं काय आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. याचा सरळ अर्थ असा की सूर्यकुमारच्या भविष्याचा अंतिम निर्णय गंभीरचाच असेल.

कर्णधारपदी कोणाचा दावा?

सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सोडले किंवा त्याला या पदावरून पायउतार व्हावं लागलं तर टीम इंडियाकडे काय पर्याय असतील. तसं पाहिलं तर टी20 संघासाठी बरेच पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे शुबमन गिल असणार आहे. कारण तिन्ही संघांसाठी एकच कर्णधार ठेवता येईल. आता वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने संयमी आणि गरजेवेळी आक्रमक खेळी केली आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर या शर्यतीत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत त्याचे नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत. या दोघांमध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे तिलक वर्माचं आहे. पण त्याच्याकडे काहीच अनुभव नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नावाचा विचार केला जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...