AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : “एक पाय चंदीगड, तर एक पाय हरयाणात…”, तिसऱ्या कसोटीत मैदानात श्रेय्यस अय्यरने कोणाला डिवचलं?

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना गमावला आहे. या सामन्यातील काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video : एक पाय चंदीगड, तर एक पाय हरयाणात..., तिसऱ्या कसोटीत मैदानात श्रेय्यस अय्यरने कोणाला डिवचलं?
तिसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यरने असं काय केलं की बॅट्समन संतापला, काय झालं नेमकं पाहा VideoImage Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2023 | 12:36 PM
Share

मुंबई : क्रिकेट म्हंटलं की जिंकण्यासाठी खेळाडू मैदानात काहीही करू शकतात. मग एकमेकांना डिवचून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असतो. असाच काहीसा प्रकार इंदुरमधील तिसऱ्या कसोटीत पाहायला मिळाला. भारतानं दुसऱ्या डावातील आघाडी मोडत फक्त 76 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकणार हे स्पष्टच होतं. पण क्रिकेटमध्ये सहजासहजी पराभव स्वीकारला जात नाही. यासाठी खेळाडू आपलं सर्वस्वी पणाला लावतात. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर भारताच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडूही एकही संधी सोडत नव्हते. त्यात श्रेयस अय्यरही मागे नव्हता.

उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर मैदानात ट्रॅविस हेड आणि मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होते.तिसऱ्या दिवसाच्या सहाव्या षटकात हेड रविंद्र जडेजाची गोलंदाजी खेळत होता. तेव्हा श्रेयस अय्यर शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा त्याने हेडला डिवचत म्हणाला, “याचा एक पाय चंदीगड आणि दुसरा हरयाणात आहे.” पण हेडला हिंदी कळत नसल्याने तो त्याच्याकडे पाहून शांतपणे उभा होता.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच श्रेयस अय्यर काय बोलला हे माइकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना 9 गडी राखून जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात ट्रॅविस हेडनं 9 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात ट्रॅविसनं नाबाद 49 धावांची खेळी केली. विजयासह मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे.

तिसरा कसोटी सामन्यात पराभूत झाल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न लांबल आहे. आता भारताला चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. कारण श्रीलंका आणि भारतात दुसऱ्या संघासाठी चुरस आहे.

टीम इंडियाने चौथा सामना गमवल्यास गुणतालिकेत भारताचे गुण 56.94 टक्के इतके राहतील.श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड दोन सामन्यांची मालिका आहे. ही मालिका श्रीलंकेन 2-0 ने जिंकली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर जाईल. या परिस्थितीत श्रीलंकेचे 61.11 टक्के गुण होतील.

भारताने आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळला असून 10 मध्ये विजय, 5 मध्ये पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.