AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Facebook, Insta,WhatsApp नंतर आता Gmail डाऊन, भारतात अनेकांना मेल पाठवण्यात अडचणी, नेमकं कारण काय?

अलीकडेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची सेवा बंद झाली होती. त्यानंतर आता जीमेल (Gmail) सेवा डाऊन झाली आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, लोक Google च्या या मोफत ईमेल सेवेमध्ये प्रवेश करताना अडचणींचा सामना करत आहेत.

Facebook, Insta,WhatsApp नंतर आता Gmail डाऊन, भारतात अनेकांना मेल पाठवण्यात अडचणी, नेमकं कारण काय?
Gmail
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 6:59 PM
Share

मुंबई : अलीकडेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची सेवा बंद झाली होती. त्यानंतर आता जीमेल (Gmail) सेवा डाऊन झाली आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, लोक Google च्या या मोफत ईमेल सेवेमध्ये प्रवेश करताना अडचणींचा सामना करत आहेत. जीमेल वापरकर्ते ना मेल पाठवू शकत आहेत ना त्यांना कोणतेही मेल येत आहेत. (Gmail Down : google mail service suffers outage in India)

इंटरनेट सेवा बंद होण्याचे निरीक्षण करणारी साइट डाऊन डिटेक्टरच्या (Down Detector) मते, 68% लोकांनी नोंदवले आहे की, त्यांना वेबसाइटवर प्रवेश करण्यात समस्या येत आहे. 18% वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शनची तक्रार नोंदवली आहे तर 14% वापरकर्त्यांना लॉगइन करण्यात समस्या येत होत्या. यूकेमध्ये जीमेलची सेवा खूप धिम्या गतीने सुरु असल्याचे एका युजरने ट्विटरवर सांगितले आहे.

लोक ट्विटरवर याबद्दल माहिती देखील देत आहेत. नेटीझन्स #gmaildown हा हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. कंपनीने अद्याप सेवा बंद होण्याचे कारण उघड केलेले नाही. दरम्यान, भारतातील अनेक भागांतील युजर्स Gmail बंद असल्याची तक्रार करत आहेत.

अगदी अलीकडे, सोशल मीडिया जायंट कंपनी फेसबुक देखील आऊटेजचा बळी ठरली होती. फेसबुकबरोबरच व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामही 6 तासांहून अधिक काळ बंद होते. गेल्या आठवड्यात असे दोनदा घडले होते, दोन वेळा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा खंडित झाली होती.

नंतर, कंपनीने सांगितले की राउटर कॉन्फिगरेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे आउटेजची समस्या निर्माण झाली होती. यामुळे फेसबुकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता युजर्स जीमेल डाउन झाल्यानंतर याबाबत गुगलच्या अधिकृत स्टेटमेंटची वाट पाहात आहेत.

फेसबुक, इन्स्टा डाऊन, कंपनीची दिलगिरी

सोशल मीडिया अ‍ॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दोनदा डाऊन झाले होते. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) रात्री 12 नंतर सुमारे एक तास दोन्ही अ‍ॅप्सवर परिणाम झाला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम काही काळ बंद होते. मात्र, नंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यापूर्वी रविवार-सोमवारी (3 ते 4 ऑक्टोबर दरम्यान) इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हरही सुमारे सहा तास बंद होते.

यासंदर्भात दोन्ही अ‍ॅप्सने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनामध्ये ज्या युजर्सना या समस्येला सामोरे जावे लागले त्यांची माफी मागितली होती. फेसबुकने ट्विट केले की, “काही लोकांना अ‍ॅप्स आणि वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही आमच्यावर किती अवलंबून आहात हे आम्हाला माहिती आहे. आता आम्ही समस्या सोडवली आहे. यावेळीही तुम्ही संयम राखल्याबद्दल धन्यवाद.”

इतर बातम्या

एकाच आठवड्यात फेसबुक, इंस्टाग्राम दुसऱ्यांदा डाऊन, कंपनीकडून दिलगिरी

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

(Gmail Down : google mail service suffers outage in India)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.