राज्यातले अनेक नेते केंद्रात गेले. ते सहकाराबद्दल बोलले. मात्र, त्यांनी काहीच काम केले नाही, अशा शब्दांत शनिवारी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरसंधान साधले. विखे-पाटील पुढे म्हणाले की, मधल्या काळात सहकार सहकार चळवळीची पीछेहाट झाली आहे. मात्र, आता आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असा आशावाद त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाहून व्यक्त केला. राज्यातील सहकारी कारखानदारीचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकांनी खासगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता टोलेबाजी केली.