Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणी आणि तेथील गौतम बुद्धांच्या शिल्पांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे नेते सचिन खरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील, अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला त्यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणी आणि तेथील गौतम बुद्धांच्या शिल्पांबाबत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे नेते सचिन खरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील, अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला त्यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
अजिंठा लेणीतील शिल्पांबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी अत्यंत चुकीचे हावभाव केल्याचा आरोप सचिन खरात यांनी केला. “बोलताना जरा अभ्यास करून बोलावं,” असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
अजिंठा लेणी आणि तेथील गौतम बुद्धांच्या शिल्पांना ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याचे सांगत सचिन खरात यांनी या विषयावर बोलताना अधिक जबाबदारीने आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्याची गरज व्यक्त केली.
“मनोज जरांगे यांनी बोलताना अभ्यासपूर्ण बोलावं,” असं आव्हान सचिन खरात यांनी केलं आहे. तसेच एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील किंवा गैरसमज निर्माण होतील, अशा प्रकारचे वक्तव्य टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, अजिंठा लेणीवरील वक्तव्यावरून सचिन खरात यांनी केलेल्या या टीकेमुळे आता या मुद्द्यावर राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
