कर्नाटकमधील पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहेत असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. शिवसेना खासदार संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.