Azadi Ka Amrit Mahotsav : आझादी का अमृत महोत्सव… 75 वर्षे प्रगतीची, आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करणाऱ्या भारताची…!

| Updated on: Aug 03, 2022 | 3:52 PM

आता भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करत आहे. या काळात देशाने प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. आजा भारत जगातला लोकशाही (Democracy) असलेला आणि आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करणारा देश आहे.

Follow us on

नवी दिल्ली : आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) हा भारत सरकारचा स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि येथील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरे करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्याचा उपक्रम आहे. हा महोत्सव देशातील लोकांसाठी समर्पित आहे, ज्यांनी केवळ भारताला त्याच्या उत्क्रांतीच्या प्रवासात आतापर्यंत आणण्यातच महत्त्वाची भूमिका बजावली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) भारत 2.0च्या सक्रियतेच्या दृष्टीकोनाला सक्षम करण्याची शक्ती आणि क्षमता त्यांच्यामध्ये आहे. इंग्रजांचे राज्य भारतावर होते. यावेळी अन्याय, अत्याचार भारतीयांनी सहन केला. अनेकांनी बलिदान दिले, त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांनी देश सोडला. आता भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरा करत आहे. या काळात देशाने प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. आजा भारत जगातला लोकशाही (Democracy) असलेला आणि आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करणारा देश आहे.