मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

| Updated on: Jun 23, 2026 | 1:16 PM

राज्यात सध्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले असताना शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात सध्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले असताना शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचं स्वतंत्र स्थान आहे आणि दोन्ही गटांमध्ये समेट व्हावा अशी माझी इच्छा आहे.”

शिवसेना फुटीबाबत बोलताना त्यांनी एक उदाहरण देत परिस्थितीचे विश्लेषण केले. “एखादं वादळ येऊन घर पडलं तर त्यासाठी फक्त वादळालाच दोष देता येत नाही. कधी कधी घरही कच्चं असतं. त्यामुळे कोणत्याही पक्षातील फूट किंवा संघर्षामागे फक्त एकाच बाजूचा दोष नसतो. दोन्ही बाजूंचं आत्मपरीक्षण आणि संशोधन होणं गरजेचं आहे,” असे ते म्हणाले.

कडू यांनी पुढे सांगितले की, राज्याच्या आणि शिवसैनिकांच्या हितासाठी दोन्ही गटांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा विचार करावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष अद्याप कायम असताना बच्चू कडू यांच्या या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 23, 2026 1:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us