Uddhav Thackeray Sabha BKC | तुमचा भाजप अटलजींचा राहिलाय का?

| Updated on: May 14, 2022 | 11:08 PM

1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते हे विसरला का? तर पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? असा सवाल ही भाजपला आणि फडणवीस यांना केला.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकेच काय तर यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. आपण औरंगाबादला संभाजीनगरच म्हणत आलो असल्याचं ते म्हणाले. अकबरुद्दीन औवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान औरंगजेबच्या कबरीवर फुलं अर्पण केले होते. त्यांच्या या वागणुकीवर राज्यभरातून टीका केली जात होती. औवेसींच्या या कृत्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी देखील घेत शाब्दिक निशाणा साधला. तर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून मुख्यमंत्री ठाकरे यांना निशाना करणाऱ्या भाजपला (BJP Party) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. त्यांनी यावेळी माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी (Former Prime Minister Atal Bihari Vajpayee) यांची आठवन करून दिली आहे. त्यांची आठवण सांगतानाल 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते हे विसरला का? तर पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? असं म्हटले आहे.