अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी…

अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी…

| Updated on: Aug 08, 2026 | 6:12 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. यावर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला. यावर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळले आहेत.

बावनकुळे म्हणाले, “माझं रक्तच नाही जे कोणी माझ्यावर मराठा आरक्षण संदर्भात आरोप करतात ते त्यांना लखलाभ आहे.” तसेच कोणाच्याही विरोधात जाणे किंवा अन्याय करणे हा आपला स्वभाव नसल्याचे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाच्या जवळचा मी आहे. जसा मी ओबीसीच्या घरातला आहे तसा मराठ्याच्याही घरातला आहे. त्यामुळे परिवारामध्ये आम्ही असं करत नाही,” असे ते म्हणाले.

मराठा समाजाला त्यांचा हक्क देण्यासाठी सरकार काम करत असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू असल्याच्या आरोपावर त्यांनी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

“मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा वर अन्याय होऊ नये,” अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Aug 08, 2026 6:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us