मी अध्यक्षांचा आदेश मानून आम्ही सभागृहातून बाहेर गेलो. 5 जुलैला मी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं. त्यावेळी भाजपच्या नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं होतं. नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांना बिस्कीट देऊन बारा आमदारांचं निलंबन करायला लावलं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या वेळी हरिभाऊ बागडे यांच्यासदर्भात काय बोलला असता, असा सवाल मी केला होता. साधा प्रश्न होता, अंगविक्षेप केला की माफी मागायला लावता. मात्र, तुमचे सदस्य असं वागतात तेव्हा तुमचा राधा सुधा धर्म कुठं केला होता, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
राज्यपाल हे केंद्राचे किंवा राज्याचे नोकर नाहीत. राज्यघटनेच्या कलम 178 नुसार संविधानिक शपथ घेतलेली असते. भारतीय संविधान सांगतं त्या प्रमाण राज्य ऐकत नसतील तर महाराष्ट्र राज्य सरकारनं दोन दोन हात करायची तयारी ठेवावी लागेल, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.