पडळकरांना छगन भुजबळ यांनी नाशिकमधून मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर महाविकास आघाडीची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला, असं कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याची आठवण त्यांनी पडळकरांना करून दिली.