संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरूच आहे. इतके नव्हेतर राऊतांची ही अटक भाजपाच्या सांगण्यावरूनच झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून लागला जातोयं. मात्र, या आरोपामध्ये काहीच खरंच नसल्याचे कालच भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. बावनकुळे बोलताना म्हणाले की, संजय राऊतांची चौकशी 600 मराठी लोकांनी तक्रारी केल्या म्हणून लागली आहे. यामध्ये भाजपाचा काहीही संबंध नाहीयं. 600 मराठी कुटुंबांची घरे राऊतांनी हडप केली आहेत.