मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला निघाले आहेत. विधान परिषदेसाठीच्या 12 नावांची नवी यादी ते राज्यपालांना देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी महाविकास आघाडीने दिलेली 12 नावांची यादी रद्द करा, असं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं होतं. त्यानंतरची त्यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे.