Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी(CM Eknath Shinde) प्रस्थापितांविरोधात लढा देऊन यशश्री खेचून आणल्याचा उल्लेख करत उदय सामंत (Cabinet Minister Uday Samant) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाच्या काळाबद्दल बोलताना, थोडा जरी दगाफटका झाला असता तर सगळं संपलं असतं, अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. त्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे एक दिवस त्यांचं समर्थन करतील असा विश्वास व्यक्त केला. पण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने अथवा दगाबाजीविषयी त्यांनी मत मात्र प्रदर्शित केले नाही. शिंदे गटातील अथवा समर्थकांपैकी कोणीही नाराज नाही. पावसाळी अधिवेशनानंतर (Monsoon Session) लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आणि सर्वांनाच खाती वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.