रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. काल रात्रीपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने संपूर्ण शहर पाण्यात गेलं आहे. मागच्या 48 तासात खेड आणि चिपळूणच्या भागात 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. कोयनाच्या खालच्या धरणाचं पाणी सोडवं लागल्याने चिपळूण शहर बुडालं. शहरात तुफान पावसामुळे घरं पाण्याखाली गेलं आहेत.