मुंबई : आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसरा दिवस असून या दिवशीही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी पत्र काढलं असून या पत्रात त्यांनी असं म्हटलं की, यापुढे मुंबईतील कोणतीही काम द्यायची असेल तर ती आमदार आणि खासदार यांनी पालकमंत्र्यांना द्यायची, मग ती पालकमंत्री ठरवतील, ही कोणती पद्धत आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या सगळ्या पद्धती बदलताय, शिवसेनेला संपवण्याच्या डावात मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल सहभागी झालेत की काय? बघा काय म्हणताय जितेंद्र आव्हाड…