सरकार मोदी-शहा यांचं हस्तक; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा शिंदे, फडणवीस यांना टोला

| Updated on: Nov 02, 2022 | 1:54 PM

काँग्रेसकडून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यात सरकार अस्तित्वात असल्याची टीका करण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार मोदी, शहा यांचे हस्तक बनल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यात सरकार अस्तित्वात असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आम्ही मोदींचे हस्तक आहोत. याचाच अर्थ ते महाराष्ट्राचे हस्तक नाहीत. कोणती श्र्वेतपत्रिका काढायची ती काढा जे खरं आहे ते काय आता जनतेपासून लपलेलं नाही, असं पटोले यांनी म्हटलं आहे.