नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडीची कारवाई, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून होत आहे. बॅरिकेट्सवरून आत शिरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील तणाव वाढला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या तसंच अग्निपथसारख्या तरुणांचं भवितव्य अंधकारमय करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे.