मुंबई : शेतकऱ्यांची सहनशक्ती आता संपली आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. कायदे बदलायला केंद्र सरकार तयार नाही. कृषी कायदे थांबवले आहेत. लोकाभिमूख निर्णय कसे असतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मंत्र्यांची मुलं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून टाकत आहेत. उद्याचा बंद शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आहे. मी जनतेला आवाहन करतो की राज्यातील जनतेने या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलीय.