गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण, तलाव आणि इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. अमरावतीतील दहीगाव धानोरा तलाव देखील ओव्हरफ्लो झाला आहे. हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली आहे. दरम्यान या तालावाला धबधब्याचे स्वरुप आल्याचे पहायला मिळत आहे. या धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे.