शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देशाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचं बजेट सामन्य माणसाला दिलासा देणारं आहे. सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये जास्त अपेक्षा ह्या इंफ्रास्ट्रक्चर आणि रेल्वेच्या समस्या आहेत. इलेक्ट्रॉनिकचंही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होणाऱ्या मुंबईला दिलासा मिळालाय. बजेटचा परिणाम रियल इस्टेटवरही होतो. यंदाच्या बजेटमुळे अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केलाय.