म्हणून मविआच्या जागावाटपाला विलंब, प्रकाश आंबेडकरांची मल्लिकार्जुन खर्गेंकडे पत्राद्वारे तक्रार काय?

म्हणून मविआच्या जागावाटपाला विलंब, प्रकाश आंबेडकरांची मल्लिकार्जुन खर्गेंकडे पत्राद्वारे तक्रार काय?

Harshada Shinkar | Updated on: Mar 12, 2024 | 6:05 PM

महाविकास आघाडीमध्ये १५ जागांवरून वाद आहे, त्यामुळे आगामी लोकसभेचं जागावाटप रख़डल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. इतंकच नाहीतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाला विलंब होत असल्याची तक्रार देखील प्रकाश आंबेडकर यांनी खर्गे यांच्याकडे पत्राद्वारे केली

मुंबई, १२ मार्च २०२४ : ठाकरे गट लोकसभेच्या १८ जागांवर ठाम आहे, चेन्नीथलांकडून यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्रही लिहिले आहेत. दरम्यान, चेन्नीथला यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेचा तपशीलही मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रकाश आंबेडकर यांनी कळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये १५ जागांवरून वाद आहे, त्यामुळे आगामी लोकसभेचं जागावाटप रख़डल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. इतंकच नाहीतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाला विलंब होत असल्याची तक्रार देखील प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आंबेडकर यांनी पत्र लिहीत काय पाठवला काँग्रेसला प्रस्ताव बघा व्हिडीओ…

Published on: Mar 12, 2024 6:05 PM
Follow Us