अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन…; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी

| Updated on: Jan 13, 2026 | 4:20 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी अनेक विकास प्रकल्पांची माहिती दिली. यात मुळा-मुठा नदी संवर्धन, मेट्रो विस्तार, उड्डाणपूल, भूयारी मार्ग आणि पाणी योजनांचा समावेश आहे. ते म्हणाले की, सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांनी ‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ या म्हणीचा वापर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी शिवाजीनगरमध्ये १२ नगरसेवक आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठिशी मी मुख्यमंत्री म्हणून खंबीरपणे उभे राहील आणि विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. पुणे शहरात पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधल्याने औंध, भोसलेनगर, गोखलेनगर परिसरातील पाणीपुरवठा सुधारल्याचे त्यांनी सांगितले. मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ४७०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये ११४ किलोमीटर मेट्रोचे जाळे विस्तारले जात असून, २३ नवीन उड्डाणपूल आणि ३२ रस्त्यांचे डीकन्जेशन केले जात आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गही तयार करण्यात येत आहेत. पूरनियंत्रणासाठी ३०० कोटी, तर रिटेनिंग वॉलसाठी २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. महात्मा फुलेवाडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक आणि भिडेवाडा येथील स्मारकांच्या कामांसाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. फडणवीस यांनी विरोधकांवर ‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ या म्हणीने अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ सुरूच राहील असेही स्पष्ट केले.

 

 

Published on: Jan 13, 2026 04:20 PM