बेळगावमधील उगार साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीची घटना कळताच आग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तब्बल वीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.