ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं काल पुन्हा एकदा फटकारलं, यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एखादी चांगली गोष्ट झाली की ती आम्ही मिळून केली आणि मनासारखं झालं नाही की हे सरकारनं केलं,हे काही बरोबर नाही. आरक्षणाच्या निर्णयाबाबत आम्हाला जसा निकाल अपेक्षित होता तसा लागला नाही.यावरून विरोधकांनी टीका करण्याची गरज नाही, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. बुधवारी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुढील दोन आठवड्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका जाहीर करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.