इगतपुरी: पावसाळ्यात (Rainy Season) रस्त्याचा फार मोठा प्रश्न असतो. कुठे फिरायला जायचं म्हटलं की आधी तिकडे जायचे रस्ते नीट आहेत की नाही हे माणूस बघतो. जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे गेलेत. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. इतका पाऊस की खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर देखील बंदी घालण्यात आलीये. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मुसळधार पावसामुळे धरण चांगलेच भरले आहेत. पर्यटक (Traveller) फिरायला बाहेर पडतायत पण रस्त्यांची अवस्था काय फार चांगली नाही. जुन्या कसारा घाटात महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झालीये.