मुंबई: महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. मात्र, या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. काकांचं दु:ख सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.