अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबईसह उपनगरात सकाळपासून वेगवान वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.