Himachal Pradesh Landslide | हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतलज नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो कोटींच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. किन्नौर जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतलज नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो कोटींच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. किन्नौर जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. पुराच्या प्रचंड प्रवाहात सुमारे 100 कोटी रुपये खर्चून उभारलेला लोखंडी पूल पाण्याखाली गेला असून, या घटनेमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पूरामुळे अनेक गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीकाठावरील घरे, मालमत्ता आणि शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्रभावित भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आणि आवश्यक मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून, हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
