गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळतोयं. यामुळे अनेक नद्यांना पूर देखील आला. पावसामुळे संपूर्ण वातारण थंडगार झाले आहे. परभणी शहरात 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा ढगाळ वातावरण बघायला मिळाले तर रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. हा पाऊस पिकांसाठी खूप जास्त महत्वाचा आणि फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. गेल्या 4 दिवसांपासून जिल्हात पावसाने दांडी मारली होती. मात्र, काल रात्रीपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झालीयं. परभणीमध्ये यंदा मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्हात बघायला मिळाले आहे.