
तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र
Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 04, 2023 7:12 AM
Related Video
Deepti Sharma चा कारनामा, पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्ससह वर्ल्ड रेकॉर्ड
उर्मिला मातोंडकर यांचा पूर्व पती मोहसिन अख्तर याने केले दुसरे लग्न...
INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?
मोठी बातमी! त्या अटीवर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद