पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!

पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!

| Updated on: Aug 11, 2026 | 12:52 PM

सोलापूरच्या राजकारणात सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना कल्याण शेट्टी यांनी अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

सोलापूरच्या राजकारणात सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी सुषमा अंधारे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका करत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना कल्याण शेट्टी यांनी अंधारे यांच्यावर निशाणा साधला.

“पंगतीमध्ये बसल्या आणि वरण संपलं, अशी अवस्था झाली आहे,” असा टोला कल्याण शेट्टी यांनी लगावला. सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाला आता कोणीही विचारत नसल्याचा दावा करत, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांकडे लक्ष न देता आपण आपले काम करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केला. “तुमचं अस्तित्व संपलं आहे. सोलापूरमधील ग्रामपंचायतीमधील एक सदस्यही तुमच्या बाजूने उभा राहत नाही,” असा दावा करत त्यांनी अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

जयकुमार गोरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवरूनच हे प्रत्युत्तर दिल्याचे कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कल्याण शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या टीकेवर सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 11, 2026 12:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us