Jammu Kashmir : ‘मेरा ये वतन..’, काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
Kashmiri school girls song : काश्मीर मधील शाळकरी मुलींनी 'मेरा ये वतन' हे गाणं गायलं असून देशभक्तिचा संदेश दिला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव स्थिती वाढली असली तरी काश्मीरमधले नागरिक मात्र हिंमतीने उभे आहेत. काश्मीर मधील शाळकरी मुलींनी ‘मेरा ये वतन’ हे गाणं गायलं आहे. या गाण्यातून त्यांनी देशभक्तीचा संदेशच यावेळी दिला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 27 पर्यटकांना निर्घृणपणे मारण्यात आलं आहे. पुलवामानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला गेला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीर मधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि भारतात देखील तणाव वाढला आहे. त्यात या चिमूकळ्यांनी गायलेलं हे गाणं सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
Published on: May 05, 2025 06:37 PM
