Maharashtra HSC 12th Result 2026 | इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल या विभागाचा?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आयोजित पत्रकार परिषदेत यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी (2025) 91.88 टक्के निकाल लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आयोजित पत्रकार परिषदेत यंदाचा एकूण निकाल 89.79 टक्के लागल्याची माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी (2025) 91.88 टक्के निकाल लागला होता, त्याच्या तुलनेत यंदा 2.09 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.
यंदाही मुलींनी बाजी मारत आघाडी कायम ठेवली आहे. एकूण 93.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 86.80 इतका आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत 94.14 टक्के निकाल नोंदवला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी राहिला आहे.
या वर्षी राज्यभरातून सुमारे 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल आज दुपारी 12 वाजल्यापासून mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष पुढील प्रवेश प्रक्रिया, गुणपत्रिका आणि करिअरच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.
