हसन मुश्रीफ पत्रकारांना बोलताना म्हणाले की, हे महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षच काय तर 25 वर्ष चालेल सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे, देशामध्ये अचानक कोरोना आला आणि त्यादरम्यान राज्या सरकारने अतिशय चांगले काम केले आहे. यामुळेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात कोणते मतभेद आहेत, असे समजण्याचे काहीही कारण नाही. मलाही ED ची नोटीस दिली होती आणि घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.