निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘मिंदे’ असा उल्लेख करत टीका केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना “लायकीत राहून बोलावे” असा सल्ला दिला होता.
शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘मिंदे’ असा उल्लेख करत टीका केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत त्यांना “लायकीत राहून बोलावे” असा सल्ला दिला होता.
दरम्यान, निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर आता ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले, “निलेश राणेंनी इतरांना लायकी शिकवण्यापूर्वी स्वतःची लायकी पाहावी. त्यांना राजकारणात ओळख आणि स्थान शिवसेनेनेच दिले आहे. त्यामुळे बोलताना त्यांनी तोंडावर नियंत्रण ठेवावे.”
पुढे बोलताना महेश सावंत यांनी निलेश राणे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. “निलेश राणेंची लायकी काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी इतरांवर टीका करताना शब्दांची मर्यादा पाळावी,” असा टोला त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे, निलेश राणे आणि आता महेश सावंत यांच्या वक्तव्यांमुळे दोन्ही शिवसेनांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून, आगामी काळात हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
