बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी तृतीयपंथींची फौज, करतायत नागरिकांना आवाहन

| Updated on: Apr 21, 2021 | 6:24 PM

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona virus) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नाशिकमधील मनमाडमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली असूनसुद्धा येथे लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नसल्यामुळे मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी  नांदगाव तालुक्यात […]

Follow us on

नाशिक : राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona virus) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. नाशिकमधील मनमाडमध्येसुद्धा रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली असूनसुद्धा येथे लोक सर्रासपणे बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोक ऐकत नसल्यामुळे मनमाड शहर प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी  नांदगाव तालुक्यात बेशिस्तांवर कारावाईचा जालीम उपाय म्हणून पोलिसांनी तृतीयपंथीयांची (third gender) फौज रस्त्यावर उतरवली आहे